विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
सोलापूर/बार्शी/दिल्ली: मतदान अधिकारी हा निवडणूक आयोगाचा कणा व श्वास असून तो अधिक सक्षम झाला पाहिजे.या उद्दिष्ट पुर्ततेसाठी
सध्या भारत निवडणूक आयोगाच्या भारत आंतरराष्ट्रीय लोकतंत्र व निर्वाचन प्रबंध संस्था नवी दिल्ली यांच्या वतीने चार राज्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार,पर्यवेक्षक,केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या साठी राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण व चर्चासत्र ११ जून ते १३ जून दरम्यान आयोजित केले होते.
केंद्रास्तरीय मतदान अधिकारी यांना अधिक सक्षम करून निवडणूक आयोगाच्या बीएलओ अँप मध्ये सुधारणा करून मतदार यादी अधिक सदोष बनविणे,अँप मध्ये सुधारणा करणे या सारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातुन १३२ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे मतदान अधिकारी श्री अनिल देशपांडे यांनी तेथील सर्व चर्चासत्रात भाग घेऊन आयोगाला अनेक सुधारणा सुचविल्या या सुचविलेल्या सुविधा मुळे मतदार नोंदी अधिक अचूक व निर्दोष होणार आहेत.तसेच अनिल देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या अँप मध्ये अनेक सकारात्मक बदल सुचविले याची आयोगाने दखल घेतली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे सहायक मुख्य निवडणूक अधिकारी श्री किरण शार्दूल यांनी निवडणूक आयोगाच्या वतीने बार्शीच्या अनिल देशपांडे यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करत अनिल देशपांडे यांचे अभिनंदन केले.
यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी,बार्शीचे तहसीलदार एफ आर शेख,नायब तहसीलदार संजीवन मुंढे,संगणक परिचालक आकाश गुळवे यांनी अभिनंदन केले.
———————————-
🎥फोटो –
उत्कृष्ट मतदान अधिकारी म्हणून राष्ट्रीय स्तरावर बार्शीच्या अनिल देशपांडे यांचा गौरव महाराष्ट्र राज्याचे सहाययक मुख्य निवडणूक अधिकारी श्री किरण शार्दूल यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देऊन दिल्ली येथे गौरव करताना