शालेय विद्यार्थ्यांसाठी नियमितवेळी बसफे-या सुरू करा

117

पळसगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):
तालुक्यातील पळसगाव परिसरातील विद्यार्थी आरमोरी तालुक्यातील आरमोरी शहरातील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असतात.मात्र शालेय वेळापत्रकानुसार बससेवा पुरविली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नियमित बससेवा सुरू करावी अशी मागणी पळसगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी तालुक्यातील पळसगाव हे ७ किमी.अंतरावर असलेलें गाव आहे.लगतच जोगिसाखरा,कासवी,पाथरगोटा,शंकरनगर, रामपूर ही गावे आहेत.या ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेय व उच्च शिक्षणासाठी आरमोरी येथे ये- जा करीत असतात. परंतु त्यांच्या शालेय वेळात या मार्गावरून बसफे-या नियमित होत नाहीत.बसची विद्यार्थ्यांना तासन् तास वाट बघावी लागते.पर्यायाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते.अशावेळी सकाळी 6.45 जाणे व परत तालुक्यातून 11.00 येणे अशी फेरी,तसेच 10.00 वाजता जाणे व 5.00 वाजता परत येणे अश्या वेळापत्रकानुसार फेऱ्या सुरू होणे अती आवश्यक आहे. तसेच ही फेरी जोगिसाखरा – शंकरनगर – पाथरगोटा – पलसगाव – जोगिसाखरा – रामपूर(नदीघाट)अशा स्वरूपाच्या असाव्यात.कारण या परिसरात हिस्त्र श्वापदे , वाघ, हत्ती, रानडुकरे यांचा वावर अती प्रमाणात असल्याने त्यापासून जीवित किँवा वित्त हानी नेहमी होत असते. वारंवार अश्या घटना पासून बचाव हो्नयासाठी ह्या परिसरात बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी पळसगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

निवेदन देतेवेळी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष ठाकूर, माजी केंद्रप्रमुख शालिक् मेश्राम, समाजसेवक विनोद पागडे, प्रा. गोपाल दोनाडकर , सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम मैंद,देविदास दोनाडकर, अशोक लोखंडे आदी उपस्थित होते.