मांगली येथे सांस्कृतिक व समाजप्रबोधन कार्यक्रम उत्साहात

102

माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
ब्रम्हपुरी (जिल्हा चंद्रपूर):तालुक्यातील मांगली येथे 26 नोव्हेंबरला खास संविधान दिनानिमित्त सार्वजनिक विचार मंच, मांगलीच्या वतीने सांस्कृतीक व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमत चंद्रपूर जिल्हा भूषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोपाल ठाकरे उपसरपंच जुगनाळा तर सहअध्यक्ष म्हणून भावेश दोनाडकर उपसरपंच मांगली, देविदास कार अध्यक्ष तं.मु.स. जुगनाळा, बनकर ब्रम्हपुरी तसेच कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून उमेश धोटे सरपंच चौगान, उपाध्यक्ष म्हणून वखारभाई खान सचिव ता.काँ.क. ब्रम्हपुरी, किशोर कार अध्यक्ष पाणी सुजल मांगल तर प्रमूख अतिथी म्हणून सौ. उषाताई बनकर सरपंच मांगली, नलूताई राऊत पो.पा. मांगली, सुभाष राऊत, शामलता कार आशा वर्कर मांगली, गोकुल कार माजी उपसरपंच मांगली, मानाजी मुंडरे माजी सरपंच मांगली, राजेंद्र पिल्लेवान, पुंडलिक सोंडवले, देवेश कामडी ग्रा.पं.सदस्य मांगली, मेश्राम , देविदास लिंगायत, बक्षी ढोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, देशावर 150 वर्ष राज्य करुन ब्रिटीश राजवट मावळत होती. अशावेळी देशात राहणाऱ्या सर्व धर्मीयांमध्ये एकता, समानता टिकवून ठेवेल अशा संविधानाची भारताला गरज होती. देश एकसंध व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत या प्रेरणेने या भारतीय संविधानाची निर्मिती झाली. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय लोकांसाठी खूप खास आहे. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.

खास संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतीक व समाजप्रबोधन कार्यक्रमाला मांगली येथील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.