निवासी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:एकत्रीत आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य पोजना महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) अंतर्गत सहाय्य संस्था (TPA) अंतर्गत कार्य करणारे”आरोग्यमित्र” (महाराष्ट्र राज्य शासन )वेतन वाढ आणि इतर मागण्यांसाठी दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ पासून गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर आहेत.यासंदर्भांत महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाला संपकरी आरोग्य मित्रांनी शेकाप नेते रामदास जराते व माकपा नेते अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MIPIAY) योजनेत “आरोग्यमित्र” सन २०१२ पासून प्रामाणिकपणे शासनाच्या आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.आरोग्यमित्र सदर योजने अंतर्गत रुग्णांची नोंदणी, रुग्णांचे समुपदेशन, लाभार्थी पात्रता निकष, पडताळणी, वैद्यकीय अधिकाऱ्याशी सल्लामसतत, रुग्णाला योजनेअंतर्गत मोफत औषधी उपचार, वैद्यकीय तपासण्या, शस्त्रक्रिया व पाठपुरावा सेवा योजनेचा प्रचार व प्रसार, जनतेमध्ये जनजागृती, आरोग्य शिबिरे, दैनंदिन माहिती अद्यावत ठेवणे, योजनेचे पर्यवेक्षक, योजनेचे जिल्हाप्रमुख तसेच योजनेचे क्षेत्र व्यवस्थापक यांना पोजनेचा अहवाल देणे, व इतर विविध कामे करत असतात.
तसेच शासनाने सन २०१८ पासून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMIAY) राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये सरकारी व खाजगी रुग्णालयात राबविण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही योजना हा “एकत्रीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हा नावाने आज शासन स्तरावरील आरोग्य क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. महाराष्ट्र शासन राज्य आरोग्प हमी सोसायटी (SHAS) अंतर्गत सहाय्य संस्था (TPA)-1) MD India Health Insurance TPA Pvt.Ltd. (२२ जिल्हे) २) Paramount Health Services & Insurance TPA Pvt. Ltd. (०६ जिल्हे) 31 Medi Assist Insurance TPA Pvt. Ltd. (११ जिल्हे) अंमलबजावणी सहाय्यक संस्था म्हणून कार्यरत असून सदर (TPA) अंतर्गत आमच्या सारख्या आरोग्यमित्राची नेमणूक झालेली आहे . आमच्यासारखे सन २०१२ पासून प्रामाणिकपणे रुग्णसेवा करत असून सुरवातीस आम्हाला ६०००/- रु व आता १२०००/- रु इतक्या तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहोत. आरोग्यमित्र उच्च पदवीधर व संगणकाचे ज्ञान असलेले चांगले संवाद कौशल्य असलेले तरुण-तरुणी आहेत. आरोग्यमित्रांनी वेळोवेळी शासन स्तरावर संबंधित रास्त मागण्या सादर केलेल्या आहेत; परंतु अद्यापही कुठलीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही तसेच दिनांक-२३/०८/२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी जीवनदायी भवन, वरळी, मुंबई येथे सर्व महाराष्ट्र राज्यातील आरोग्पमित्रांनी एक दिवसीय निदर्शने व आंदोलन केले होते. त्यात आरोग्यमित्रांच्या वेतनवाढ संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहाय्य संस्था (TPA) यांना सूचना दिल्या असताना देखील आजपर्यंत सदर बाबींची दखल घेतली गेली नाही.
त्यामुळे संबंधित विभागाने
आरोग्पमित्रांना दरमहा रु २६०००/- वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल आस्थापना व महागाई भत्ता द्यावा, वेतनात दरवर्षी १०% वाढ करण्यात यावी,आरोग्यमित्राचे शासन स्तरावर (SHAS) मध्ये समायोजन करण्यात यावे,सन २०१८ पासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जान आरोग्य योजना (PAJAY) आम्ही विना-वेतन काम करीत आहोत तरी सन २०१८ पासून नियुक्ती पत्र व कामाचा मोबदला देण्यात यावा तसेच नियुक्ती पत्रावर “आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMAM असा उल्लेख असावा,आरोग्पमित्रांची (TPA) मार्फत पिळवणूक चालू असून त्यांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे, आरोग्पमित्र रमेश पंडित बैसाणे (धुळे) व आरोग्पमित्र गणेश अशोक शिंदे (नाशिक) यांना पूर्वीप्रमाणे कामावर रुजू करून घेण्यात यावे अशा सर्व मागण्यांचा राज्य आरोग्य यंत्रणेने व संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी एकमुखी मागणी गडचिरोली जिल्हा आरोग्य मित्र संघटनेने निवेदनातून केली आहे.
निवेदनदेतेवेळी तसेच राज्यव्यापी बेमुदत संप व धरणे आंदोलनात आरोग्य मित्र जिल्हा संघटनेचे पदाधिकारी सारा शेख,बालाजी चांदेकर,विनोद मोहनकर,नेहाल भानारकर,दिक्षा जोगे,मनोज तोरे,श्रीकांत कोसरे,संतोष कुकडकार,भूषण देशमुख,सचिन ओक्सा,मुके हवळे,अजित भैयाजीबुरे,डिम्पल कुंभारे आदी उपस्थित होते.