८ नोव्हेंबरला आरमोरीत राष्ट्रीय जनजागृती मंगल कलश यात्रा आगमन

172

सहपरिवार व मित्रपरिवारासह सहभागी व्हा

गायत्री परिवार आरमोरी शाखेचे आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): महाराष्ट्र अश्वमेध महायज्ञ (दि.२३जानेवारी ते २८जानेवारी) या कालावधीत मुंबई महानगरीत संपन्न होत आहे.त्यानिमीत्ताने राष्ट्रीय जनजागरण मंगल कलश यात्रेचे आगमन आरमोरी नगरीत ८नोव्हेंबर २०२३रोजी होत आहे.

सदर यात्रेचे आगमन श्री दत्त मंदिर देवस्थान आरमोरी ( बर्डी) येथे सकाळी ११वाजता असून शिस्तबद्ध पद्धतीने आरमोरी शहरातील मुख्य मार्गाने पुढे बंजारी माता मंदीर येथे पोहचणार आहे.येथे भाविक भक्त, सेवाधिकारी व नागरिकांना श्री गायत्री अश्वमेध यज्ञाबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.तसेच पुढे ही यात्रा गडचिरोली महामार्गावरून पुढे नियोजित स्थळी पदार्पण करणार आहे.

राष्ट्रीय जनजागरण मंगल कलश यात्रेचे स्वागताकरिता नागरिकांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन या दिव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री परिवार शाखा आरमोरीचे सेवाधिकारी मोतीराम चापले,प्रभाकर कापकर, मधुकर दडमल,रमाताई हेमके,प्रा.गंगाधरराव जुआरे, वासुदेव प्रधान, कल्पना तिजारे,सुरेश जुआरे, शंकरराव बोरकर,कमल नखाते, अशोक मेश्राम,दिपकर माकडे व महादेव माकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.